Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

MPSC मार्फत 15 हजार 511 पदांच्या भरतीला मान्यता

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून  अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्व विभागांनी  मंजूर पदांचा तात्काळ  आढावा  घेऊन आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे स्पष्ट निर्देश श्री.ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना दिले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा देत  तातडीने ही कार्यवाही झाली पाहिजे असे सांगितले. MPSC मार्फत 15 हजार 511 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असुन सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading