fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक

मुंबई, दि. 4 – कोकलणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्यांना घेऊन अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अर्णब यांना घरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायगडमधील आत्महत्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण
अन्वय नाईक यांनी रिपब्लिक tv चॅनल च्या स्टुडीओ च्या इंटेरियर डिझाईन चे काम केले…यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते.. परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली…. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे….या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading