fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

३९ वर्ष शिवसेनेत जे पाहिलं, अनुभवल तरे सारं बाहेर येईल – नारायण राणे

मुंबई : ‘आमचा तोल गेला तर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढू आणि नंतर ते महागात पडेल. आमच्याकडे नजर फिरवु नका, नाही तर कपडे संभाळताना पळताभुई थोडी होईल’ अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला. रविवारच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपूत्रांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी बेडूक म्हणून उल्लेख केला. 

याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. ‘इतकीवर्ष साहेबांकडून पाहून गप्प बसलो. पण राणे कुटुंब, भाजपावर आगपाखड केली, तर ३९ वर्ष शिवसेनेत जे पाहिलं, अनुभवल तरे सारं बाहेर येईल असा इशाराच राणेंनी दिला. निवडणुकीच्याआधी हिंदुत्व मुख्यमंत्री बनताना सेक्युलर हे गांडूळसारख झालं. 

 ‘सरकार पाडायचं काय, ते पडतच आलंय’, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading