Sunday, June 21, 2026
PUNE

उद्योजकांच्या वीज, पाणी बील विषयक अडचणी सोडवू – उद्योग मंत्री सुभाष देसाई

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ शिष्टमंडळाची बैठक यशस्वी

पुणे, दि. 22 – राज्य शासनाच्या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना कोरोना लॉक डाऊन काळात कारखाने बंद असतानाही वीज आणि पाणी वापराची जी बिले(मिनिमम चार्जेस बिल) आली आहेत,ती माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिले.

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना आलेल्या वीज,पाणी वापरासंदर्भात येणारी मिनिमम चार्जेस ही बिले माफ करण्याची मागणी केली. कोरोना लॉक डाऊन काळात कारखाने बंद असतानाही वीज आणि पाणी वापराची जी बिले(मिनिमम चार्जेस बिल) आली आहेत,ती माफ करण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन उद्योजकांना दिलासा द्यावा,अशी मागणी शिष्ट मंडळाने केली. सरकारच्या समोर हा प्रस्ताव असून बिल माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.
कोरोना लॉक डाऊन काळात उद्योजकांचे झालेले नुकसान पाहता,बँकांनी पुढील काळात त्यांना सुलभ कर्ज द्यावे,असे सरकारचे निर्देश असतानाही बँका याबाबतीत चाल ढकल करीत असल्याचे यावेळी शिष्ट मंडळाने उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.नव्या परिस्थितीत उद्योग उभारणी करण्यासाठी सरकार बँकांना योग्य ते निर्देश देईल,असे आश्वासन सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.
‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल, भाऊसाहेब जंजिरे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading