Sunday, June 21, 2026
PUNE

पुण्यात कडकडीत लॉकडाऊन: उरुळी देवाची मध्ये पाण्यासाठी प्रचंड झुंबड

पुणे, दि. 15 – कोरोना साथ कमी होण्यासाठी पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाला पुणे शहर पूर्णपणे कडकडीत बंद झाले आहे ,पण पाण्यासाठी उरुळी देवाची गावामधील महिला , वृध्द, लहान मुलांची, लोकांची प्रचंड झुंबड उडाली आहे, हे चित्र पाहिले तर आपल्याला कडक उन्हाळ्याची आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाची आठवण होईल पण हे चित्र आहे पुणे शहरातील.

अ दर्जा महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे .पत्रे लिहली ,निवेदने दिली ,आक्रोश मांडला,प्रसार माध्यमांनी दखल घेतली पण महापालिका अजुन ही जागी होईना आणि उरुळी करांची दैना संपेना. या साठी ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध केला.यावेळी महिला मोठ्या संख्येने आपअापल्या घरासमोर आणि चौका चौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन निषेध व्यक्त केला .लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही . मंतर वाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही .सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकर ला होणारी गर्दी टाळून पाइपलाइन ने पाणी सुरू करावी अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही . . को रोणा मुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून अजुन टँकर भोवती गर्दी जास्तच वाढत आहे . उरुलीत सद्या टँकर जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी होते. या मुळे कोरोणा चां प्रादुरभाव होण्याचा धोका नाकारण्यात येवू शकत नाही.
ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगर पालीकेच्या वतिने करण्यात आलेला आहे.शिवाय 10 दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकिही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे .
कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सद्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे.पुण्यातील वाढता कोरोना चा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोणा ला थांबवू शकतो .त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे .तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे
तरी टॅंकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, शिवाय सद्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो .यामुळे लोकांन्ना कोरोनाची लागण होवु शकते.त्यासाठी महालिकेला जबाबदार धरले जाईल .
आठ दिवसात बंद नलीकेद्वारे पाणी गावाला सुरु करणेत यावे.असा इशारा आज माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading