मोहन भागवत वक्तव्य : पापक्षालन करायचं म्हणजे ब्राह्मणांनी चूक केल्याचं मान्य केल्यासारखं आहे – आनंद दवे
पुणे:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. पिढ्यानं पिढ्या झालेल्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं. या भागवतांच्या विधानाचा ब्राह्मण महासंघानं निषेध केला आहे. ब्राह्मण महासंघानं पुण्यातील संघाच्या कार्यालया,त निवेदन दिलं आहे.
ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. आनंद दवे म्हणाले,पापक्षालन करायचं म्हणजे ब्राह्मणांनी चूक केल्याचं मान्य केल्यासारखं आहे. काही व्यक्तींकडून नक्कीच चुका झाल्या असतील पण त्याच समाजातल्या काही नेत्यांनी, काही व्यक्तींनी त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे. दुसरा समाज पुढे येण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. याचा सुद्धा उल्लेख त्यांच्याकडून व्हायला हवा होता, असं ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.
मागच्या पाच-पन्नास वर्षांपूर्वी गुलामगिरी होती. लोकांना विकलं जात होतं पण त्यावर आता असं कोणी म्हणत नाही की, पापक्षालन करावं. मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा कोणी म्हणत नाही की त्याबद्दल पापक्षालन करावं. त्यामुळं पाच-सातशे हजार वर्ष आधीची एखादी घटना उकरुन काढून हिंदू समाजात मतभेद निर्माण करायचे, ब्राह्मण समाजात मतभेद निर्माण करायचे, ब्राह्मण समाजाला वेगळं पाडायचं हा उद्देश भागवतांकडून झालेला आहे, अशी आमची ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासंघ म्हणून ठाम भूमिका आहे. असंही दवेंनी स्पष्ट केलं.