एब्सोल्यूट बारबेक्यू ने बाणेर येथे उघडले आपले रेस्टॉरंट
यावेळी बोलताना,फाउंडर आणि सीईओ – प्रोसेनजीत रॉय चौधरी म्हणाले, आमचे सध्या ५८ आउटलेट आहेत आणि विमाननगर येथे आणखी आउटलेट उघडण्याची योजना आहे आणि इतर ५ आऊटलेट्सचे देखील बांधकाम सूरू आहे. प्रत्येक आउटलेटसाठी अंदाजे ३.५ करोड गुंतवणूकीची आवश्यकता आहे. आणि पुढील २ वर्षांत सुमारे १०० आउटलेटपर्यंत पोहोचण्याची आमची योजना आहे. सध्या आमच्या ग्रुपची उलाढाल अंदाजे रु. ४३० कोटी आहे. आमच्या सर्व रेस्टॉरंटमधील सर्व कर्मचार्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले आहे आणि ग्राहकांना भेटताना ते सर्व सुरक्षा उपायांचे पालन करतात, एबीच्या सर्व रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य, स्वच्छता आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते.
आम्ही एब्सोल्युट बारबेक्यूमध्ये ग्राहकांच्या जबाबदारी सोबतच आमच्या सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवतो आणि समाजाचे देणे परत करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या ५८ व्या आउटलेटच्या लाँचसाठी ब्रँडने “उत्कर्ष, तळेगाव” या मानवतावादी दृष्टीकोणातुन कार्यरत एनजीओशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचां दृष्टीकोण आणि ध्येय निराशाजनक जीवनात आशा निर्माण करणे हे आहे. ते गरीब, गरजू ,उपेक्षित, वंचित आणि सोडून दिलेल्या अश्या लोकांसाठी कार्य करतात. एबीने आपल्या उद्धाटनासाठी उत्कर्ष एनजीओ मधील सुमारे ४३ मुलांना लॉन्चच्या वेळी आमंत्रित केले आहे. यावेळी एबीची संपूर्ण टीम आणि वरिष्ठ व्यवस्थापन या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवतील आणि त्यांना सन्मानित करतील.
हा एनजीओ रस्त्यावरील/झोपडपट्टीतील मुलांपर्यंत पोहोचणे, अनाथ आणि निष्पाप मुलांना आश्रय देणे, विधवांची काळजी घेणे, एचआयव्ही पॉझिटिव्ह उद्ध्वस्त कुटुंबे आणि मुले यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करतो.