fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘भेदाभेद अमंगळ’ हा तुकोबांचा संदेश देशभक्तीसाठी महत्वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

देहू : ज्या शिळेवर बसून तुकाराम महाराजांनी 13 दिवस तपस्या केली. ती तुकारामांचे वैराग्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. तुकोबांची शिळा ही भक्ती आणि ज्ञानाची आधार स्वरूप  शिळा आहे. देहुतील शिळा मंदिर हे केवळ भक्ती शक्तीचे केंद्र नसून भारताच्या सांस्कृतिक भविष्यालाही प्रशस्त करते.  संत तुकोबाराया हे संत सांप्रदायाचे कळस आहेत. त्यांचे अभंग हे अनेक पिढयांसाठी मार्गदर्शक आहेत. ‘भेदाभेद अमंगळ’ हा तुकोबांचा संदेश देशभक्तीसाठी खूप महत्वाचा आहे. संत परंपरेमुळेच भारत एकजूट असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले.

संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वारकरी संत मुरलीबाबा, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोंधीत करताना भाषणाची सुरूवात मराठीमध्ये केली. मोदी म्हणाले…

पालखी मार्गासाठी एकूण 11 हजार कोटी

पालखी मार्गासाठी एकूण 11 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणाऱ् आहे. याअंतर्गत 350 किमी महामार्ग तयार केले जाणार आहेत. ज्यातील तुकाराम पालखी मार्गाचा विकास हा 3 टप्प्यात केला जाणार आहे. तर ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा विकास हा 5 टप्प्यात केला जाणार आहे. यामुळे तीर्थ क्षेत्रांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

प्रसाद योजने अंतर्गत तीर्थक्षेत्रांचा विकास

पालखी मार्ग विकासासाठी प्रयत्न केले जात असताना; चाराधाम यात्रेसाठीही महामार्ग निर्मिती केली जात आहे. आयोध्येत राम मंदिराचे निर्मितीचे काम सुरू आहे. संपूर्ण देशात प्रसाद योजने अंतर्गत तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच तिर्थांचाही विकास केला जात आहे. त्यांचे महू येथील जन्मस्थळ, लंडन येथील त्यांचे वास्तव्य असलेले घर, मुंबईतील चैत्य भूमी, नागपूरची दीक्षाभूमी व दिल्लीतील महापरीनिर्वाण स्थल यांचा समावेश आहे.

दलीत, वंचितांचे कल्याण ही देशाची पहिली प्राथमिकता

दरवर्षी होणारी वारी ही सबका साथ सबाका विकास, सवाका विश्वास याच मंत्रावर सुरू आहे. सरकारी योजनांचा लाभ हा प्रत्येकाला मिळत आहे. पंढरीच्या वारीत पुरूषांप्रमाणे चालणाऱ्या महिला या महिला मिळणाऱ्या समानतेचच प्रतीक आहे. तुकाराम महाराज म्हणायचे ‘जे का रेंजले गांजले ..’ म्हणजे समाजातील सर्वात खालच्या वर्गातील माणसाला आपलेसे करणे आहे. हा मंत्र घेवून पुढे वाटचाल करीत आहे. दलीत, वंचित, आदिवासी यांचे कल्याण ही देशाची पहिली प्राथमिकता आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading