देशमुख आणि मालिक यांना
मतदानाचा अधिकार नाकारून न्यायालयाने ठाकरे यांना चपराक लगावली – किरीट सोमय्या
पुणे: उद्या राज्यसभा निवडणूक होत आहे . त्यामुळे
भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असा सामना
बघायला भेटत आहे. विविध घोटाळ्यांमध्ये मध्ये अडकलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता.
त्यावर आज सुनावणी झाली .कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. असे सांगितले त्यावर
अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना राज्यसभा निवडणूक मतदानाचा अधिकार नाकारून न्यायालयाने उद्धव ठाकरे ना चपराक लगावली आहे अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे.
किरीट सोमय्यानी आज विविध मुद्यांवर भाष्य केले.
दाऊद च्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला हायकोर्टाकडू न ही दिलासा मिळणार नाही. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
मेधा सोमय्या ने शिवडी कोर्टाने संजय राऊत विरोधात दाखल केलेली याचिका आज न्यायालयाने स्विकारली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा शंभर कोटीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयात हजर व्हाव लागणार असं किरीट सोमय्या यांनी सांगितल.
राज्यातील 12 कोटी जनतेने माझ्यावर महविकास आघाडी सरकारच भ्रष्टाचार उघडकीस आणन्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामूळे भाजप कडून मला राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली नाही याची मला जराशिही खंत नाही अस देखील किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.