एण्ड टीव्हीवरील कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दरवर्षी राज्याचा स्थापनादिन म्हणून १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, जो कामगार दिन म्हणून देखील ओळखला जातो. एण्ड टीव्हीवरील कलाकार ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’मधील अथर्व (तरूण भीमराव) व जगन्नाथ निवंगुणे (रामजी सकपाळ), ‘बाल शिव’मधील मौली गांगुली (महासती अनुसूया), ‘हप्पू की उलटन पलटन’मधील हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा) आणि ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी) त्यांच्या शुभेच्छा हा खास दिन साजरा करण्यासाठी एकत्र येत आहेत.
अथर्व म्हणाला, ”मी पुण्याचा आहे, जे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर असण्यासोबत काही सर्वोत्तम शैक्षणिक संस्था, संपन्न सांस्कृतिक वारसा, फूड अशा गोष्टींनी संपन्न सर्वोत्तम शहर आहे. दरवर्षी आपण महाराष्ट्राच्या स्थापनेनिमित्त हा दिवस साजरा करतो. महाराष्ट्र भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. आपल्या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आपण आपला गौरवशाली इतिहास व संस्कृती आणि त्याची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली अफाट वाढ व विकास यांना उजाळा देऊन अभिमान बाळगू या.”
जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, ”आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना हा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद व सन्माननीय क्षण आहे. मी ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखले जाणारे शहर पुण्याचा आहे आणि या शहरामध्ये अनेक आघाडीचे उद्योगपती व व्यक्तिमत्त्वे आहेत. वर्षानुवर्षे शहरामध्ये प्रचंड विकास दिसून येत आहे, ज्यामुळे हे देशातील सर्वोत्तम स्मार्ट शहर बनत आहे. मी कामानिमित्त अनेकवेळा मुंबई ते पुणे प्रवास करतो. मुंबई हे माझे दुसरे घर आहे. मी या शहराचा खूप ऋणी आहे, ज्याने मला प्रसिद्धी, सन्मान व आपुलकी दिली आहे.”
मौली गांगुली (महासती अनुसूया) म्हणाल्या, ”महाराष्ट्रामध्ये वन्यजीव, इतिहास, धर्म आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा विलक्षण वारसा आहे आणि राज्याला “योद्धांची भूमी” म्हटले जाते. मी मुंबईत आले तेव्हा एका महाराष्ट्रीयन कुटुंबासोबत चार वर्षे पेइंग गेस्ट म्हणून राहिले आणि ते आजही माझ्यासाठी एका कुटुंबासारखेच आहेत. मला महाराष्ट्रीयन संस्कृती आवडते आणि गेली अनेक वर्षे “लेझीम” आणि “ढोल पथक” यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा मला नेहमीच आनंद होतो.”
हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा) म्हणाल्या, ”हा दिवस महाराष्ट्राच्या दीर्घ आणि गौरवशाली इतिहासाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. हे असे राज्य आहे, ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणा-या देशाच्या वित्तीय सेवा उद्योगाचे घर म्हणून आपले पूर्ववैभव कायम ठेवले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची संस्कृती वैविध्यपूर्ण आणि चैतन्यशील व समृद्ध आहे. मी पुरणपोळी, कांदेपोहे, थालीपीठ, मिसळ आणि इतर उत्कृष्ट महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेते.”
रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी) म्हणाले, ”महाराष्ट्र दिन राज्यभरात जल्लोषात व उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राचा उत्साह वैश्विक, अग्रणी विचारसरणी, सहिष्णू व गतीशील आहे आणि या राज्याने मला बरेच काही दिले आहे. या दिनी माझे कुटुंब आणि मी पारंपारिक लावणी संगीत कार्यक्रम, लोकगीते आणि सुप्रसिद्ध मराठी संतांच्या कवितांचे पठण अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जातो. कोणत्याही कलाकारासाठी महाराष्ट्र हे प्रमुख मनोरंजन क्षेत्र आहे आणि या राज्याने मला माझ्या अभिनय करिअरदरम्यान अनेक संधी दिल्या आहेत.”