राज्यात सत्तेवर असणारं सरकार अपघातानं सत्तेत आलंय ; विनय सहस्त्रबुद्धे यांची ठाकरे सरकार वर टीका
पुणे : राज्यात सत्तेत आलेलं सरकार हे अपघातानं सत्तेवर आलेलं सरकारचा असून या सरकारबाबत ना लोकांना अपेक्षा होती ना सरकारमध्ये सहभागी पक्षांची इच्छा होती ज्याप्रमाणे वीज कोसळावी तसं हे सरकार राज्य कोसळलं असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची दोन वर्ष या विषयावर भाजपाने पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सहस्त्रबुद्धे बोलत होते.
या पत्रकार परिषदेला भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक पुणे शहर भाजपाचे शहर सहप्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
सहस्त्रबुद्धे म्हणाले, आपलं अपयश लपवण्यासाठी राज्य सरकार वारंवार केंद्र शासनाकडे बोट दाखवत आहे .
राज्य सरकार महाविकास आघाडीचे सरकार नसून महाविनाश आघाडीचं सरकार आहे असं देखील यावेळी विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले.
पेट्रोल डिझेल वरील दर केंद्र सरकार कमी करत नाही अशी राज्य सरकार वारंवार केंद्र सरकारवर टीका करत आहे त्यावर सहस्त्रबुद्धे म्हणाले, पेट्रोल डिझेल वरील दर राज्य सरकार ने कमी केले पाहिजेत. दारूचे दर दारूचे दर कमी करायला यांच्याकडे वेळ आहे. जीवनावश्यक वस्तू वरील दर कमी करायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी सहस्त्रबुद्धे यांनी टीका केली राज्य सरकारवर केली.