एसटीचे विलगीकरण होत नाही तोपर्यंत भाजप एसटी कर्मचाऱ्यांना धान्य पुरवणार – गोपीचंद पडळकर
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारने अजूनही विलगीकरण केले नाही आहे.त्यामुळे मागच्या महिन्यातल्या 28 तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण होत नाही म्हणून आंदोलन चालू आहे . त्यावर राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडतो आहे.खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा आहेत . जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण होत नाही तोपर्यंत भाजप एसटी कर्मचाऱ्यांना धान्य पुरवणार अशी माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमाला आले असता पत्रकाराना दिली.
गोपीचंद पडळकर म्हणाले,भाजप हा तळागळात ला पक्ष आहे .आमची नाळ ही सगळ्याशी जोडली आहे .
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण करत नाही म्हणून एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. राज्य सरकारी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे.विलीनीकरण चे लेखी पत्र द्यायला पाहिजे. अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारकडे केली. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्या बाबत निर्णय घेत नाही फक्त चाल ढकल करत आहे. अशी टीका पडळकर यांनी राज्य सरकारवर केली.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे परत केले आहेत. त्यावर गोपीचंद पडळकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर टीका न करता जे आझाद मैदानात जी रेल्वे पोलीस भरतीसाठी जी उन्हात उभी आहेत. त्यांच्यावर लक्ष द्यावे. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.