Wednesday, June 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

दरड कोसळुन जीवितहानी झाली; याकरता शास्त्रीय अभ्यास करुन नियोजन करण्याची गरज – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील


पुणे:रायगड जिल्ह्यात तळये गावात जी दरड कोसळुन जीवितहानी झाली .याकरता शास्त्रीय अभ्यास करुन नियोजन करण्याची गरज आहे अस मत राज्याचे गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांनी मत व्यक्त केल.

पुण्यात सरहद संस्थेच्या वतीन कारगिल विजय दिवसाला बावीस वर्षै पुर्ण झाली त्यानिमित्ताने कोरोना काळात विशेष काम करणाऱ्याचा गौरव वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.माळीण मध्ये ज्या पध्दतीने कायमस्वरुपी नागरिकांचे पुर्नवसन करण्यात आले तसे पुर्नवसन राज्य सरकार करणार आहेत.पश्चिम घाटाकरता गाडगीळ समितीचा अहवाल का स्विकराला नाही .याबाबत मला माहिती नाही कुंद्रा प्रकरणात सध्या चांगला तपास मुंबई पोलिसांचा सुरू असुन अशा गोष्टी समुळ नष्ट केले जाणार आहे.तसेच पँगेससचा वापर करुन राज्यात फोन टँप करणे किंवा वाँच ठेवणे अशा घटना समोर येत आहेत तर याबाबतीत विशेष काम सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले .दरम्यान उद्या मी आंबेगाव परिसरात दरडप्रवण क्षेञ आहे त्याची पाहणी करणार आहे. असे गृह मंत्री  दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading