खाजगी बॅंकानी स्पर्धेत टिकण्यास ‘विश्वासार्हता वाढवणे गरजेचे’ – गोपाळदादा तिवारी
पुणे दि १० – भारतातील पहील्या ‘इंडसंड बॅक’ या खाजगी बॅंकेचे ऊदघाटन, १९९४ साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॅा मनमोहनसिंग यांचे हस्ते झाले व त्या बॅंकेचे मुख्य कार्यालय ‘पुणे शहरात’ आहे या दोन्ही बाबींचा ‘पुणेकर व काँग्रेसजन’ म्हणून अभिमान वाटत असुन, खाजगी बॅंकानी स्पर्धा काळांत आपली विश्वासार्हता वाढवून, आपली गुंतवणूक ‘सार्वजनिक व लोकहितार्थ प्रकल्पात केल्यास ‘पैशांची सुरक्षीतता, पारदर्शकता व गुंतवणुकीवर योग्य व्यवसाईक मोबदला’ या सर्व बाबीं साधल्या जातील, असे आवाहन देशातील एक अग्रेसर असलेल्या “इंडसंड बॅंकेच्या” नुकत्याच झालेल्या कोथरूड शाखेच्या ऊदघाटन प्रसंगी ‘राजीव गांधी स्मारक समिती’ अघ्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
‘दिप प्रज्वलन’ करून कोथरूड शाखेचा दि१९ डीसें रोजी शुभारंभ करण्यात आला…या प्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक अमित जाघव, विभागीय कार्यकारी अधिकारी चिंतामणी कांगो, शाखा व्यवस्थापक तेजल मोरे व कर्मचारी इ ऊपस्थित होते.. ‘इंडसंड बॅक’ संगम प्रेस रोड, करीष्मा सोसा जवळ, (कोथरूड ब्रॅंच) पुणे येथे सूरू झाली असून, बॅंकेत ‘सेफ डीपॅा लॅाकर्स ऊपलब्ध असून, मुदत ठेवींवर सर्वाधीक ७% व्याज आहे, तसेच बॅंकेच्या क्रेडीट कार्ड वर पाँइंटंस पेक्षा ‘कॅश बॅक’ सुविधा ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे या वेळी बॅंके तर्फे सांगण्यात आले..