केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी-देवेंद्र फडणवीस
मुंबई – विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे सुद्धा फार मोठे नुकसान झाले आहे. याच कारणास्तव भाजप नेते देवेंद्र फडवणीस हे आजपासून तीन दिवस अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी आजपासून बारामती येथून त्यांचा दौरा सुरु केला आहे. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. ऐवढेच नाही तर केंद्र मदत करणार आहे. मात्र सद्यच्या घडीला केंद्राच्या मदतीची वाट पाहू नये. तसेच राज्य सरकार या प्रकरणी काय मदत करणार ते सुद्धा त्यांनी स्पष्ट करावे अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मंदिर उघडण्यावरुन पाठवण्यात आलेल्या पत्रासंबंधित सध्या वाद सुरु आहेत. मात्र ही वेळ आता वाद घालण्याची नसून शेतकऱ्यांचे लक्ष देण्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने राज्य सरकारने मदत करावी असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याचसोबत आमचा दौरा घोषित करण्यापूर्वी कोणीही अतिवृष्टी जिल्ह्याच्या दौऱ्याचे नाव सुद्धा काढले नसल्याचा टोला ही फडवणीस यांनी लगावला आहे.