fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ७६ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.१४ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ७६ हजार ४१८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ९६ हजार ४७० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १३ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१२ (८७० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार ००७

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ९१ हजार १२७.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८२

(मुंबईतील ४५ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,  नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५,  ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, जालना ग्रामीण १, अमरावती शहर १,  उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी, औरंगाबाद शहर १, नवी मुंबई १)

कोरोना बाधित पोलीस – १४७ पोलीस अधिकारी व १०६५ पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading