सांस्कृतिक विचारधारा ‘त्यांच्या’ पर्यंतही पोहोचावी – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे
पुणे, दि. 1 – बुधवार पेठेच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहे. जेथे अनेकदा कीर्तन सप्ताह होतात. परंतु बुधवार पेठेतील महिलांना त्यांच्या मुलांना कीर्तनाचा आनंद घेता येत नाही. कीर्तन म्हणजे काय त्यांना माहिती नाही. कीर्तनाची सांस्कृतिक विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी. अशी अपेक्षा राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली.
युगंधर मित्र मंडळ, आनंद नगर आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा – यशोदा पौष्टिक शिशु आहार उपक्रमांतर्गत देवदासी महिलांच्या बालकांना पौष्टीक आहार मिळावा या हेतूने पौष्टीक पिठे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शुभांगी आफळे, युगंधर मित्र मंडळचे अध्यक्ष मयूर पोटे, साईनाथ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष पियुष शाह, निलेश थोरात, सागर नवले, शंकर निंबाळकर, विशाल कदम, अजय आबनवे, किरण शेटे, पुरुषोत्तम डांगी , हनुमंत शिंदे, अनिरुद्ध येवले, स्वप्नील पंडित, अजय आबनवे, भावेश ठक्कर, नंदू ओव्हाळ, सागर घम यावेळी उपस्थित होते.
चारुदत्त आफळे म्हणाले, देवदासींच्या मुलांना पौष्टीक शिशु आहार देण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. स्वयंशिस्त पाळून येथील महिलांनी स्वत:ला आणि आपल्या मुलांना कोरोनापासून लांब ठेवले आहे, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
पियुष शहा म्हणाले, लॉकडाउनमुळे समाजातील सर्वच घटकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा काळात बुधवार पेठेतील मुलांना पौष्टीक आणि चांगला आहार मिळावा यासाठी पौष्टीक पीठे देण्यात आली आहेत.
पियुष शहा म्हणाले, लॉकडाउनमुळे समाजातील सर्वच घटकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा काळात बुधवार पेठेतील मुलांना पौष्टीक आणि चांगला आहार मिळावा यासाठी पौष्टीक पीठे देण्यात आली आहेत.