fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

Big News – महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम

मुंबई, दि. २८ – राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊन सुरु आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला, त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज राज्य सरकारच्या मंत्रीमडळाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपेंनी माहिती दिली.

ब्रेक द चैन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन केलं आहे. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावं लागेल, अशी परिस्थिती आहे. सर्व मंत्री लॉकडाऊन वाढण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचं की काय करायचं, याचा निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. लॉकडाऊन हे वाढणारच आहे. हे लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढेल असा माझा अंदाज आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading