दलीत साहित्याची पहिली लेखिका मुक्ता साळवे -श्रीपाल सबनीस
पुणे : दलीत साहित्याची चळवळ 1950 च्या नंतर सुरुवात झाली असे मानले जाते. परंतु त्या अगोदर कित्येक वर्ष भारतातील अस्पृश्य समाजाच्या व्यथा मांडणारे लेखन मुक्ता साळवे या. सावित्री बाई फुले यांच्या शाळेतील विद्यार्थी मुलीने केले; आणी त्याचे पुरावे ही सर्वत्र आहेत. त्यामुळे दलीत साहित्याची पहिली लेखिका ही मुक्ता साळवे असल्याचे प्रतिपादन आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे अभिवादन सभेत केले.
ते म्हणाले की, आम्हा अस्पृश्य समजाचा धर्म कोणता आहे. असा क्रांतिकारी प्रश्न तिने त्या काळात येथील प्रस्थापित व्यवस्थेला विचारून पहिले क्रांतिकारी बंड केल्याचे सबनीस म्हणाले .मुक्ता साळवे ही क्रंतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची नात होती. आज क्रंतीगुरू लहुजी साळवे यांच्या स्मुर्ती दिनाच्या अभिवादन सभेत सबनीस बोलत होते.
त्यांनतर ते म्हणाले की ,महात्मा फुले ,वासुदेव बळवंत फडके ,लोकमान्य टिळक यांचे वस्ताद लहुजी साळवे हे गुरू होते. केवळ त्यांनी तालमी पुरते प्रशिक्षणाचे काम केले नाही; तर येथील सामाजिक, शैक्षणिक व स्वांतत्र लढ्यातील विरांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे.स्वामी दयानंद यांची मिरवणूक पुण्यात काढली त्यावेळी त्याचे पूर्ण श्रेय लहुजी वस्ताद साळवे यांना जाते.
या मुख्य सभेचे आयोजन संयोजक, क्रंतीगुरु लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी केले होते. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संगमवाडी येथील स्मारकाच्या सद्य स्थितीची माहिती दिली.
या अभिवादन सभेस अशोक लोखंडे, नगरसेविका स्वाती लोखंडे, रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाचे मातंग आघडी प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, अनिल हतागले, दलीत युवक आंदोलनाचे सचिन बगाडे, शंकर तडाखे, सुभाष मातंग, दादासाहेब सोनवणे, विकास सातारकर, रामदास साळवे, भास्कर नेटके, राम कसबे, विनोद शिंदे, दीपक वायाल, उमेश शिंदे यासह पुणे शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.