fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

मोदींनी सामान्य माणसांचे जगाने मुश्किल केले – अतुल लोंढे

पुणे : केंद्र सरकारने महागाई ही वाढवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खूप त्रास होत आहे त्यामुळे विरोधी पक्ष मागच्या वर्षापासून आंदोलन करत आहेत आज पुणे शहर काँग्रेसतर्फे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची पत्रकार परिषद रस्त्यावर घेण्यात आली तेव्हा अतुल लोंढे यांनी पत्रकारांशी संवाद साधला .अतुल लोंढे म्हणाले ,प्रश्न हा सामान्य माणसांच्या अस्तित्वाचा आहे म्हणून प्रेस रस्त्यावर घेतली. मोदींनी निवडून यायच्या आधी जे वचन दिले ती ते पूर्ण करतील अशी अपेक्षा होती. पण ते काही केले नाही. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदींवर केली.


अतुल लोंढे म्हणाले ,सामान्य माणसाचं जगणं हे या सरकारने मुश्किल केलं आहे.केंद्र सरकार आपल खापर हे नेहमी दुसऱ्यावर फोडत आहे.आठ वर्षात १०० टक्के भाव वाढ झाली आहे. ही तर सर्व जनतेची फसवणूक आहे. आता तर गव्हाचा स्टॉक देखील संपत आला आहे. तुम्ही म्हणाला होता रुपया पडला की पंतप्रधानांची इज्जत पडते मग आता डॉलर एवढं पडला तर मग कुणाची इज्जत पडली आहे . असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.
लोंढे म्हणाले, केंद्र सरकार राज्य सरकारसोबत बदमाशी करत आहे.सिलेंडर वर राज्य सरकार टॅक्स लावत नाही.सबसिडी सोडायला सांगितल आणि त्यात घोळ केला.उज्वला गॅस योजनेत देखील फसवल. ही तर जगणं मुश्किल करणारी महागाई. असे टीका अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर केली.

अतुल लोंढे यांनी जोराज्यात मशिदीवरील भोग्याचा वाद सुरू आहे. त्यावर सुद्धा भाष्य केले, अतुल लोंढे म्हणाले,मंदिर मस्जिद करून पोट भरणार नाही.७० वर्ष आम्ही एकोप्याने राहीलो आणि आता जातीय तेढ निर्माण केला जात आहे.विकास हाच आमचा उद्देश आहे. असे लोंढे म्हणाले.
महानगरपालिका निवडणुका थोड्या दिवसात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आघाडी होणार का हा प्रश्न आहे त्यावर पत्रकारांनी विचारले,तुम्ही निवडणूकित राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार का.
त्यावर अतुल लोंढे म्हणाले,१०० टक्के राष्ट्रवादिने पाटीत खंजीर खुपसला.अनेक निवडणुकीत त्यांनी धोका दिला आहे. असा आरोपही त्यांनी राष्ट्रवादीवर केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading