जीवनात आनंद आणि स्थिरतेसाठी अध्यात्म गरजेचे- कुलगुरु प्रा.डॉ.नितीन करमळकर
श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर, पुणे अध्यात्म केंद्र यांच्या वतीने पूज्य गुरुदेव श्री राकेशजी लिखित ‘आत्मसिद्धी शास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फॅकल्टी आॅफ ह्युमॅनिटीच्या प्रमुख डॉ.अंजली कुरने, वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनाचे प्रमुख डॉ. पराग काळकर, इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष सुंदरवर दास, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे संस्थापक डॉ.संजय चोरडिया आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तत्वज्ञान विभागाच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी आॅनलाईन संवाद साधला. भरत मेहता आणि जिग्नेश फुरिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, महात्मा गांधी यांनी राजकारणाला अध्यात्माची जोड दिली. गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे गुरू होते तर श्रीमद राजचंद्र हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. राजकारणाचे अध्यात्मिकीकरण करायचे असे गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार होते. त्यांची ही इच्छा त्यांचे शिष्य महात्मा गांधी यांनी पूर्ण केली. त्यांना अध्यात्माचे अधिष्ठान श्रीमद राजचंद्र यांनी दिले.