रामायण मालिकेत ‘रावण’ साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे निधन
मुंबई : दूरदर्शनवर प्रचंड लोकप्रिय मालिका रामायणातील रावणाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
अरविंदचे रामायणचे सहकलाकार रामायणातील लक्ष्मण सुनील लाहिरी यांनी दिवंगत अभिनेत्याचा एक फोटो शेअर केला आणि बुधवारी पहाटे इन्स्टाग्रामवर लिहिले, “बहत दुखद समाचार है की हमारे सबके प्यारे अरविंद भाई (रामायणचा रावण) अब हमारे बिच नहीं रहे भगवान उन्की आत्मा को शांती दे (ही अतिशय दु: खद बातमी आहे. आमचे प्रिय अरविंद भाई आता आमच्यात राहिले नाहीत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो). मी अवाक आहे मी वडीलांसमान व्यक्तीला गमावले आहे. ते माझे मार्गदर्शक, हितचिंतक आणि एक सज्जन व्यक्ती होते. ”
एबीपीने दिलेल्या एका बातमीत म्हटले आहे की अभिनेता अस्वस्थ आहे आणि तो चालण्यासही असमर्थ होते. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदींचा हवाला देत बातमीत म्हटले आहे, “काका गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. गेल्या तीन वर्षात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना काही वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. ”
कौस्तुभने पुढे म्हटले आहे की, “तो गेल्या महिन्यातच त्यांना हॉस्पिटलमधून परत आणले होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे मुंबईतील कांदिवली निवासस्थानी निधन झाले. अरविंदचे अंतिम संस्कार बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास केले जातील अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला, अरविंदच्या मृत्यूबद्दल अफवा पसरली होती आणि लाहिरी यांनी ते ठीक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी एक अरविंद यांचा एक फोटो शेअर करत मे 2021 मध्ये लिहिले, “आजकाल, कोविड -19 साथीच्या आजारामुळे आपल्यावर वारंवार वाईट बातम्या धडकत आहेत. आणि याचवेळी अरविंद त्रिवेदीजी (रावण) यांच्या बद्दल खोटी बातमी होती. अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना मी असे करण्यापासून परावृत्त करण्याची विनंती करतो … देवाच्या कृपेने अरविंद जी ठीक आहेत आणि देव त्यांना नेहमी निरोगी ठेवो अशी मी प्रार्थना करतो. ”
रामायण मालिकेने दिली देशभर ओळख
.”रामानंद सागर यांची निर्मिती असलेल्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला खरी कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. ‘रामायण’मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल. रामायण मालिकेनंतर अरविंद त्रिवेदी यांनी ‘विक्रम और बेताल’ या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमधूनही काम केलं . पण त्यांना रामायण मालिकेतील रावणाच्या भूूमिकेमुळेच देशभर ओळख मिळाली आणि तीच शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांनी 300 हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे. गुजराती रंगभूमीवरील अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. दरम्यान, अरविंद त्रिवेदी यांच्या बंधू उपेंद्र त्रिवेदीही गुजराती रंगभूमी आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते.
राजकारणातही एंट्री
रामायणातील भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीटही दिलं गेलं. त्यांनी गुजरातच्या साबरकांठा मतदारसंघातून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि बहुमतानं विजयी देखील झाले. 1991 ते 1996 या काळात ते लोकसभेत खासदार होते.