जर आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर आम्ही आंदोलन करणार – अतुल खूपसे पाटील
पुणे: शेतकऱ्याच्या ऊसाला वाहतूक दरवाढ करा व उसाला मना सारखी एमआरपी द्या अशी मागणी आम्ही आज शेतकरी साखर आयुक्त याच्या कडे करणार आहोत. जर आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीतर आम्ही
साखर संकुल येथे आज पासून आंदोलन सुरू करणार असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या बरोबर ऊस वाहतूक दरवाढ विषयी बैठकिला जाताना दिला.
अतुल खूपसे पाटील म्हणाले, ऊसाला खूप वर्षे ऊसाचे कारखाने योग्य ते भाव देत नाही आहेत.शेतकरयाच्या ऊसाला मनासारखा एमआरपी भेटत नाही.म्हणून आम्ही 3 दिवसा पूर्वी पंढरपूर येथे लाखोच्या संख्येने पंढरपूर येथील उसाच्या कारखान्यासमोर आंदोलन केले.आम्हची प्रशासन व ऊसाच्या जे कारखाने आहेत त्याच्या कडे एकच मागणी आहे.ऊसाला योग्य ते भाव द्या व वाहतूक दर व उसाच्या दराबाबत सविस्तरपणे दर जाहीर करा .अशी मागणी अतुल खूपसे पाटील यांनी केली.