fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन अल्पकाळात उर्कु नये – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : राज्यापुढे राजकीय, सामाजिक तसेच शेती, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण आदींविषयिचे अनेक  प्रश्न उभे आहेत. यावर सा़गोपांग चर्चा होण्याकरिता विधीमंडळाचे पूर्ण काळ अधिवेशन घेतले जावे. अल्पकाळात ते उर्कु नये, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रा द्वारे केली आहे.

कोविड साथीच्या कारणाने यापूर्वीचे जवळ जवळ सर्व अधिवेशन हे अल्पकाळ घेण्यात आले. मात्र, आता कोविड प्रतिबंधक लसीचा ठोस पर्याय आपल्यापुढे आहे. तरी कोविडच्या कारणाने अधिवेशन अल्पकाळात उरकण्यात येऊ नये अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे.

माझ्या माहितीप्रमाणे केंद्रा मध्ये ४०० हून अधिक खासदारांचे लसीकरण झाले आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये जवळपास निम्मे आमदार आणि बहुसंख्य कर्मचारी वर्ग यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत. उरलेल्यांना पहिला डोस देण्यात यावा. हे काम काही फार अव्हणात्मक नसून राज्य सरकार ने तयारी दाखवली तर सहज शक्य आहे असे शिरोळे म्हणतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण मोहीमेला गती दिली जात आहे. त्याचा लाभ घेत आमदार आणि प्रशासकीय स्टाफला प्राधान्याने लस देण्यात यावी आणि अधिवेशन हे पूर्ण काळ घेण्यात यावे अशी मागणी आमदार शिरोळे यांनी आपल्या पत्रा द्वारे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading